12 Jun 2023

Ginger Farming

 हवामान :

  • उष्ण व दमट हवामान असलेल्या तसेच उष्ण व कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते. 

  • लागवड कालावधी : एप्रिल ते जूनचा पहिला पंधरवाडा   ( ३० ते ३५ डिग्री सेल्सियस उगवणीस उत्तम )

  • वाढीच्या कालावधीत २० ते ३०  डिग्री सेल्सियस व २५ ते ४० % पर्यंत सावलीच्या ठिकाणी पिकाची वाढ जोमाने होते


जमीन :
  • निचऱ्याची, मध्यम प्रतीची, भुसभशीत कसदार असावी. 

  • जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. 

  • नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढीसाठी उत्तम. 

  • जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढीसाठी भरपूर शेणखत, कंपोस्ट किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा. 

  • जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक सिंचनाचे ड्रीपर निवडावे. 

  • जमीन हलकी असली तरी ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थपन महत्वाचे आहे. 


कुळवाच्या पाळी पूर्वी सेंद्रिय खत घालावे :
  


वाण :

वरदा,महिमा,रीजाथा ,माहिम

  • आले : रिओ – डी -जानिरिओ, चायना, वैनाड स्थानिक, ताफेन्जिया.  

  • सुंठनिर्मितीसाठी : करक्कल, नादिया, नरन, वैनाड, मननतोडी, वाल्लुवानाद, एरनाड,कुरूप्पमपाडी.      

  • तेल : स्लिवा स्थानिक, नरसापटलाम, एरनाड, चेरनाड, हिमाचल प्रदेश.   

  • जास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूप्पमपाडी, रिओ – डी – जानिरिओ.  


लागवड हंगाम व लागवड:
  • एप्रिल ते जूनच्या पहिल्या पंधरवड्या पर्यंत करावी. 

  • उशिरा लागवडीमुळे कंदमाशी व कंद कूज यांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होतो. 

  • लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी. 

  • लागवडीला कंदाचे वजन २५ ते ५० ग्रॅम असावे. 

  • २.५ ते ५ सेंमी लांब असावे व बियाणे सुप्तावस्था संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले . 

  • एकरी १० क्विंटल बियाणे लागते. 

  • प्रक्रिया केलेले कंद ४ ते ५ सेंमी खोल लावावा. 


जैविक खते :
 

जीवाणू खत

कार्य 

अझोटोबॅक्टर

नत्र स्थिरीकरीण करणारे जिवाणू 

पीएसबी

स्फुरद विघटन करणारे जिवाणू 

केएसबी

पालाश विघटन करणारे जिवाणू 

मायकोरायझा

स्फुरद व इतर आवश्यक अन्नघटक शोषून घेणारे जिवाणू 



आले पीक खत व्यवस्थापन :
1) विद्राव्य खते :

2)सूक्ष्म पोषक खते:


3) द्रवरूप  खताचा वापर  : फवारणी आणि ठिबक:


आले पिकाला पारंपरिक पाट पाणी पद्धतीने पूर्ण पिकाच्या कार्यकाळात (200 दिवस) १३०० ते १५०० mm पाण्याची आवश्यकता असते.


आले पिकातील कीड नियंत्रण:


  • कंद माशी Rhizome Fly 

  • माशी डासासारखी पण आकाराने मोठी काळसर रंगाची असते. अळ्या उघड्या गड्ड्यांमध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात. 

  • नियंत्रण :

  • क्विनॉलफॉस (२५% EC ) २ मिली / लिटर पाणी किंवा डायमिथोएट १.५ मिली / लिटर पाणी मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान आलटून पालटून १२ ते १५ दिवसाच्या अंतराने फवारावे. 

  • फोरेट (१०%) एकरी ५ ते १० किलो बुंध्यांपाशी टाकावे. 

  • सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये आवश्यकतेनुसार फवारणी घ्यावी अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये.


  • पाने गुंडाळणारी अळी:

  • ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर २ ऱ्या आठवड्यापर्यंत प्रादुर्भाव दिसतो. 

  • अळी हिरवट रंगाची असून, अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या शरीराभोवती पण गुंडाळून घेते. 

  • आतील बाजूने पान खाण्यास सुरुवात करते. 

  • नियंत्रण:

  • क्लोरोपायरीफॉस १ ते २ मिली / लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 


  • खोड पोखरणारी अळी:

  • जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत प्रादुर्भाव दिसून येतो. 

  • अळी छोट्या खोडाला छिद्र करून आतून खाऊन उपजीविका करते त्यामुळे खोड पिवळे पडून वाळते . 

  • अळी छिद्रातून जाळीदार बारीक गोळ्यांन मध्ये विस्टा बाहेर टाकते. 

  • नियंत्रण:

  • मेल्याथिऑन २ मिली / लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी. 


  • सूत्रकृमी :

  • मुळातील रस शोषण करतात. 

  • पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात. 

  • सूत्रकृमींनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या मर रोग बुरशीचा प्रादुर्भाव होतो. 


  • नियंत्रण:

  • चांगली मशागत करावी. 

  • शेणखत अर्धवट कुजलेले (३ ते ४ महिन्याचे) वापरावे. 

  • वर्षभर कुजलेल्या शेणातून सूत्रकृमींचा प्रादुर्भाव वाढतो . 

  • शेणखतातून गंधक भुकटी (२५ किलो / एकर ) व निंबोळी पेंड (५०० किलो / एकरी) वापरावे. 


  • हुमणी :

  • पिकास नुकसान करणारी अळी अवस्था जुलै पासून मार्च पर्यंत असतो. 

  • प्रादुर्भाव वाढल्यास ७५% पर्यंत पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. 

  • मे व जून महिन्यात अंडी अवस्था जमिनीत असते. 

  • जुलै महिन्यात अळी अंड्यातून बाहेर येऊन मुळ्या व लहान कंद खाते. 

  • प्राथमिक लक्षणात पाने पिवळी पडतात. माती उकरून शहानिशा करावी व उपचार लागलीच करावे. 

  • नियंत्रण:

  • लागवडीनंतर जैविक कीटकनाशक - बिव्हेरिया - १ लिटर + मेटारायझिम १ लिटर + निरसे दुध २ लिटर + गुळ १ किलो कोठारी ड्रीप इरिगेशन मधून सोडावे.


  • कंदकूज (गड्डे कुजव्या):

  • ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत दिसतो व वाढतो. 

  • पानाचे शेंडे करपतात. कडांनी खालीपर्यंत वळत जातात. 

  • खोड जमिनीलगत काळपट राखाडी दिसते. गड्डाही वरून काळा पडतो व निश्तेज दिसतो. 

  • कंदकूज होण्याचे प्रमुख कारण : खोल खुरपण, सूत्रकृमी 

  • कंदास प्रथम इजा होते त्यातून पिथियम, फ्युजॅरियम बुरश्या आत शिरतात. 

  • नियंत्रण:

  • पावसाळ्यात पाणी साचू न देणे. चर काढून पुण्याला वाट करणे. 

  • मेटॅलॅक्झिल (८ %) + मॅंकोझेब (६४%)  बीजप्रक्रिया. 

  • गंधक (द्रवरूप ) ठिबक सिंचनातून युरिया खता सोबत वापरावे. 

  • ट्रायकोडर्मा चा वापर करावा. 


  • पानावरील ठिपके:

  • रोगाची सुरुवात कोवळ्या पानावरुन परारून पूर्ण पानांवर पसरते. 

  • पानांवर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.

  • नियंत्रण:

  • मॅंकोझेब २.५ ग्रॅम / लिटर पाणी  किंवा कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अथवा १% बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करावी. 

  • परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात आवश्यकतेनुसार फवारण्या कराव्यात. 




No comments:

Post a Comment